तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून… ; संजना घाडी यांनी नवनीत राणा याना फटकारले

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अवघ्या महाराष्ट्र पाहत आहे. ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेवर टीका करण्याची खा. नवनीत राणा एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.यातच राणा यांनी नुकतीच केलेली टीका शिवसेनेला चांगलीच झोंबली आहे.   मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला किरकोळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांचा शिवसेना (Shivsena) प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

त्या म्हणाल्या,   नवनीत राणा (Navneet Rana) जरा तोंड सांभाळून……कोण आहात आपण “सी” ग्रेड फिल्म (Film) मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या…. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला….काय संबंध आपला हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) शी….. हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर  मुलाखती मध्ये आपल्याला देता आलं नाही… म्हणे मी हनुमान भक्त…. भाजपाच्या सी …..डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने (MNS) भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं…. तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात.

ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला (Mosque) फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती. तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली वगैरे वगैरे….. म्हणून  मातोश्री आणि मातोश्री चे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत. बाळासाहेबांचे राहिले नाहीत…पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील…. हे तुमच्यासारख्या मुंबईची मुलगी’ म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी “C” ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते….. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे.

कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका… शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे….. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापू असे शिवसेना उपनेता  व प्रवक्ता संजना घाडी म्हणाल्या.