Sanjay Nirupam | ..म्हणून काँग्रेसने माझ्यावर कारवाई केली, संजय निरुपम यांनी सांगितला घटनाक्रम

Sanjay Nirupam | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मुंबई वायव्य येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाने उमेदवार दिला आहे. ही जागा काँग्रेसच्या संजय निरुपम यांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) प्रचंड आक्रमक झाले होते.

त्यामुळे काँग्रेसने (Congress) त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र, संजय निरुपम यांनी वेगळाच दावा केला आहे. आधी मी राजीनामा दिला मग माझ्यावर कारवाई झाली असं ते म्हणाले.

आज माध्यमांशी संवाद साधताना संजय निरुपम म्हणाले, “माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होतं. त्यामुळे मी काल (३ एप्रिल) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनामा पाठवला. त्यानंतर तत्काळ माझ्यावर कारवाई करण्यात आली. राजीनाम्यातील माझे शब्द, माझ्या भावना पाहून त्यांना वाटलं असेल की हे प्रकरण खूप जास्त होईल. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कारवाई केली. म्हणजेच ए फोर साईजचा कागद काँग्रेसने बरबाद केला, असं मला वाटतं.” असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत