जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिले ‘जय श्रीरामचे’ नारे

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awad) यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीरामचे’ नारे देण्यात आले आहेत. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा समारोपासाठी राष्ट्रगीत झाले. त्यानंतर आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र भारत चिरायू होवो आशा घोषणा द्यायला सांगितले. विद्यार्थ्यांनी तशा घोषणा दिल्यानंतर आव्हाड यांनी जय हिंद म्हणत कार्यक्रमाचा समारोप केला. त्याचवेळेस अचानक समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी जय श्रीराम चे नारे देण्यास सुरुवात केली.