संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? पंकजा मुंडे कडाडल्या

संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का ?, पंकजा मुंडे कडाडल्या

औरंगाबाद : औरंगाबादेत आज भाजपच्या ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला चांगलच फैलावर घेतलं आहे. मी आधीच उपाशी आणि त्यात उपवास, बहुजनांची अवस्थाही अशीच आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

तर जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दात मुंडे यांनी ठाकरे सरकारला ललकारलं आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री असल्याच्या वक्तव्यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या,चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं पंकजा म्हणाल्या. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.

Previous Post
फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणाल्या, आनंद आहे!

फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणाल्या, आनंद आहे!

Next Post
‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उचलला की षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात’

‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उचलला की षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात’

Related Posts

नकळत ‘या’ 3 गोष्टी लिव्हर खराब करतात, तुम्ही पण बघा त्यांचा आहारात समावेश नाही का?

आजकाल लोकांमध्ये यकृताच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. पण, त्रासदायक गोष्ट अशी आहे की बहुतेक लोकांना याबद्दल सांगितले जात…
Read More
नागपुरात गणेश विसर्जनाच्या वेळी भीषण अपघात, फटाक्यांच्या शोदरम्यान आग; 7 महिला भाजल्या | Nagpur News

नागपुरात गणेश विसर्जनाच्या वेळी भीषण अपघात, फटाक्यांच्या शोदरम्यान आग; 7 महिला भाजल्या | Nagpur News

महाराष्ट्रातील नागपूरच्या (Nagpur News) उमरेड तालुक्यात गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांच्या प्रदर्शनादरम्यान मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली…
Read More
विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का? - अमोल मिटकरी

विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का? – अमोल मिटकरी

नागपूर – राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर ‘कोळशी’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने…
Read More