Ramdas Athwale | कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला; आठवलेंची तुफान टोलेबाजी

Ramdas Athwale | बारामती लोकसभा (Baramati LokSabha 2024) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता पुणे क्लब हाऊस येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सुनेत्रा पवार यांचे पती व उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी केली आहे.

नेहमीप्रमाणे आपल्या कवितांनी रामदास आठवलेंनी (Ramdas Athwale) भाषणाची सुरुवात केली. “एवढंच सांगतो की ‘अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे, अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे… कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला.. अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला”, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

रामदास आठवलेंनी केलेल्या कवितेमुळे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्येही हास्याची लकेर उमटली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेताच व्यासपीठावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही हसत डोक्याला हात मारला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात