“ही लोकं किती मुर्ख आहेत याचा प्रत्यय आला”, सुनील गावसकरांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. या विजयाानंतर भारताते माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavakskar) यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

गावस्कर यांनी एका वृत्तपत्राच्या स्तंभात लिहिले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध भारताला २१३ धावा करता आल्या. त्यानंतर भारतीय संघ हा सामना जाणून बुजून हरण्याचा प्रयत्न करत आहे, अशी ओरड पश्चिम सीमेपलीकडील (पाकिस्तान) सर्व लोकांनी केली. पण हे लोक किती अज्ञानी आणि मूर्ख आहेत. भारत श्रीलंकेकडून हरला असता आणि त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला. त्यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे वाहून गेला, तर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नसता, अशी शक्यताही लोक विचार करतात. ही समीकरणे असूनही भारत मुद्दाम का हरेल? त्यामुळे ही लोकं किती मुर्ख आहेत, याचा प्रत्यय सर्वांना आला आहे. त्यामुळे जी लोकं अशी ओरड करत होती त्यांच्या चेहऱ्यावर ही एक जोरदार चपराक आहे. ”

https://youtu.be/TX3th3G8Jxw?si=h95znRKD99Z0jYXs

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल