मुद्दाम रामायणावर असं वाह्यात नाटक केलंच का गेलं?, ललित कला केंद्राच्या कृतीवर संतापल्या शेफाली वैद्य

Pune SPPU News : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Lalit Kala Kendra) ‘बिहाइंड द स्क्रीन लाइफ ऑफ द ॲक्टर्स प्लेइंग रामलीला’ हा कार्यक्रम रंगला. मात्र स्टेजिंगदरम्यानच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या नाटकात माता सीतेशी संबंधित अनेक आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये दाखवल्याने हा वाद वाढला. वाद वाढत गेल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर रामलीलावर आधारित नाटक करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विद्यापीठातील (Pune SPPU) प्राध्यापक आणि ५ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणावरुन शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांनी ललितच्या विद्यार्थ्यांचे कान टोचले आहेत. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेफाली वैद्य यांनी लिहिले की, प्रश्न हा आहे की असं मुद्दाम रामायणावर असं वाह्यात नाटक केलंच का गेलं? तेही आत्ता? लोक अजून २२ तारखेच्या कार्यक्रमाने भारावलेले असताना?

 

तुमची अभिव्यक्ती जर विकृत आणि खोडसाळ असेल, एका समाजाच्या भावना मुद्दाम दुखावणारी असेल तर विरोधही त्याच भाषेत होणार, कारण तुम्हाला फक्त तीच भाषा समजते. झुंड एकच होती. ललीत कला वाल्यांची. पलीकडून येतोय तो फक्त त्याच भाषेत केलेला प्रतिवाद आहे. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सिलेक्टिव पुळका असणाऱ्या लोकांनी गप्पच बसावे!, अशी सणसणीत चपराक शेफाली वैद्य यांनी मारली आहे.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा